HIS 310 | आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास | YCMOU BATY HIS310 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 156 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास' (HIS 310) यात आपण ब्रिटिश सत्तेचे महाराष्ट्रावरील परिणाम आणि राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राची भूमिका होती. इंग्रज भारतात व्यापारी वेषात आले. मराठी सत्तेचा पराभव करून आपले केवळ राजकीय प्रभुत्वच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक कल्पनाही त्यांनी एतद्देशीयांर्यावर लादल्या. शिवाजी राजेंनी लहान वयातच मोठ्या धैर्याचे दर्शन घडवून मराठी राज्य स्थापन केले. बाळाजी विश्वनाथ, थोरला बाजीराव यांनी इंग्रजांना विरोध करून मराठेशाहीला वैभवाचे दिवस प्राप्त करून दिले.
१८५७ चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना मानली जाते. १८५७ पूर्वीही सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर, आदी संस्थानांत उठाव घडून आले होते. महाराष्ट्रातील भिल्ल, रामोशी, कोळी व बेरड या जमातींनीही उठावात आपले योगदान दिलेले आहे. १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम जरी अपयशी झाला असला तरी यातूनच वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू यांची सशस्त्र क्रांतिकारकता निर्माण झाली हे आपणास विसरून चालणार नाही. संस्थानिकांच्या काळातही महाराष्ट्रात सुधारणेचे वारे वाहू लागले होते. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानांत शिक्षणाच्या सोयी पुरविल्या, समाजातील तळागाळाच्या लोकांना शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्तरांत स्थान देऊन जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला.
आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्र राज्याने मोठे योगदान दिलेले आहे. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राने विविध क्रांतिकारक, विचारवंत व सामान्यजन यांच्या माध्यमातून हे योगदान दिलेले आहे. संपूर्ण भारताचा राष्ट्रीय इतिहास अभ्यासताना आपल्याला प्रादेशिक इतिहास विसरून चालणार नाही. महाराष्ट्रातील प्रबोधन व धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तन बांतून यास मोठी शक्ती प्राप्त झाली.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र
घटक १ : ईस्ट इंडिया कंपनीची महाराष्ट्रातील वाटचाल (१६०० ते १८५८)
घटक २ : १८५७ च्या लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान
घटक ३ : इंग्रजी अमदानीतील आर्थिक धोरण
घटक ४ : संस्थानिकांच्या प्रभावाखालील महाराष्ट्र
पुस्तक दुसरे : महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन
घटक १ : धार्मिक प्रबोधन
घटक २ : सुधारणावादी चळवळ
घटक ३ : कामगार चळवळी
घटक ४ : सांस्कृतिक परिवर्तने
पुस्तक तिसरे : राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग
घटक १ : इंग्रजी अमदानीविरुद्ध उठाव (१८४० - १९१०)
घटक २ : लोकमान्य टिळक
घटक ३ : महात्मा गांधी
घटक ४ : संस्थानातील आंदोलने
- --
- --
Suchitra Santosh Walse 14-Jul-2022 03:58 pm